मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीच्या शुभेच्छा!

 दिवाळीच्या शुभेच्छा!

प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येला परतले. १२ वर्षाचे तप संपवून पहिल्यांदा प्रभू रामचंद्र सीतामाता, लक्ष्मण आणि पवनसुत हनुमानासोबत जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा अयोध्यावासी जनतेने त्यांचे दिवाळी साजरी करून स्वागत केले. तेव्हापासून हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. 

दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि प्रेरणेचा सण आहे. जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचा हा उत्सव आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. हंगामाच्या शेवटी, लोकांना कुटुंब आणि मित्रांसाठी नवीन कपडे, भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे मिळालेले असतात.  कार, ​​बाईक, दागिने आणि घरे यासारख्या मोठ्या वस्तू खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीही त्यांना मिळते. त्यामुळे दिवाळी साजरी करणे, अर्थव्यवस्थेला गती देणे, इतरांच्या जीवनात काही बदल घडवून आणणे हा मोठा उद्देश हा सण साजरा करण्याचा आहे. दिवाळी हे जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींतील यश साजरे करण्याचे रूपकही आहे. श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद लुटतात. दिवाळीत प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रकारचे स्वप्न आणि मनात उत्साह असतो. लहान मातीचे दिवे, आकाशकंदील आणि निरनिराळ्या सजावटीच्या वस्तूंनी आपली घरे सजवली जातात. फराळाची, गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. फटाके आणि रोषणाई करून हा सण उत्साहाने साजरा केल्या जातो. 
धनश्रीने बनवलेला इको फ्रेंडली आकाशकंदील

या दिवसात लोक कुटुंबासाठी वेळ काढतात, एकत्र येतात आणि मजा करतात. दिवाळीचा उद्देश आत्मज्ञानाचा  प्रकाश पसरवण्यात आहे. दिवाळी आपल्याला शत्रुत्वाचा मार्ग सोडून मैत्रीचा अवलंब करण्यास शिकवते. शहरी जीवनाच्या गजबजाटात, ही एक वेळ आहे जेव्हा लोक एकत्र काही दर्जेदार वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात.

दिवाळी म्हणजे अंतर्मुख होण्याचा आणि आपल्या अंतःकरणात आणि मनात ज्ञान आणि सत्याचे दिवे प्रज्वलित करण्याचा उत्सव आहे. आपल्या मनातील अंधार आणि अज्ञानाच्या शक्तींना दूर करण्याचा समारंभ आहे. हे करत असताना, इतरांना चांगुलपणाला प्रकाश देण्याचा उद्देश आहे. देवी लक्ष्मी, संपन्नेतची देवता आहे. दिवाळीच्या काळात आपण लक्ष्मीमातेला संपन्नता, करुणा, क्षमा आणि प्रेम-दया यासारख्या आध्यात्मिक संपत्ती (समृद्धीसह) जोपासण्यासाठीचा आशीर्वाद मागतो.  

गेल्या वर्षभरातील आपले विचार, शब्द आणि कृती यावर चिंतन आणि मूल्यमापन करण्याची ही वेळ आहे. आपले पूर्वग्रह, नकारात्मक वागणूक आणि वाईट सवयी मान्य करण्याची आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही वेळ आहे, जेणेकरून आपण स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सुरू करू शकू. आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अधिक प्रेमळ, दयाळू, आदरणीय कसे होऊ शकतो हे शोधण्याची ही वेळ आहे. सर्व संपत्ती, मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक, कमनशिबी लोकांसोबत शेअर केली करण्याची बुद्धीही लक्ष्मीमाता देते.  

या वर्षी, आपण कोरोनाशी लढत आहोत. ही महामारी आपल्या सर्वांसाठीच एक मोठी शिकवण आहे. कोविड 19 पासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची आणि काळजी घेण्याची ही वेळ आहे. आता वेळ आली आहे, ती परत बाउन्सबँक होण्याची. 

दीपोत्सवाच्या या शुभ सणाच्या दिवशी, आपले जीवन आनंदी, समृद्ध आणि आरोग्यदायी जावो ह्या शुभेच्छा.


विनोद, धनश्री आणि अथर्व बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.) 


५ टिप्पण्या: